Skip to main content

Full text of "DHANGARACHA KUTRA - SOVIET CHILDREN'S BOOK - MARATHI"

See other formats


RENA 


कायूम 
तांग्रीकुलीयेच 
धनगराचा 
कुत्रा 


STAR 


कायूम तांग्रीकुलीयेच 
धनगराचा 


अनुवाद : अनिल हवालदार 
चित्रे : एदुआर्द झान्यान्स्की 


प्रगती प्रकाशन , मॉस्को 


TORE 


ALLED 


कुत्रा 


700 


SHERS 


S 


US 


2 


OR 


MOBI 


धनगराचा कुत्रा 


तो धनगर त्या वाळवंटात एकटाच उभा होता . त्याचा मदतनीस शेजारच्या खेड्यातून 
बाया -पिण्याच्या वस्तूंचा साठा आणायला गेला होता . जोपर्यंत त्या म्हाताऱ्या कझाख धनगरापाशी 
त्याची विश्वासू बंदूक होती आणि इमानी कुत्रा होता , तोपर्यंत त्याला वाळवंटाची भीती वाटत 
नव्हती . लांडग्यांच्या कोणत्याही हल्ल्याला त्यांनी परतवून लावले असते . 

आपल्या वाकड्या काठीवर रेलून तो धनगर विचार करीत उभा होता , तोच टेकडीपलिकडे 
वेटोळेदार धुराचा लोट त्याच्या नजरेला पडला . जणू एखादा प्रचंड राक्षस चिलीम ओढत असावा 
असे त्या धुराच्या लोटाकडे पाहून वाटत होते . 

सकाळी धुळीचं वादळ होणार , धनगराचा इशारा खरा ठरणार , " काहीसा चिंताक्रांत 
होत तो स्वतःशी म्हणाला .. 

मुळीच वेळ न गमावता त्याने आपल्या मेंढयांच्या कळपाला वाऱ्याच्या झोतांपासून दूर , 
टेकडीच्या निवाऱ्याला नेले . दरम्यान त्याचा कुत्रा मेंढयांना ताब्यात राखायला मागेपुढे धावत 
होता . एकदा का मेंढ्यांमध्ये घबराट माजली की , त्यांना आवरणे कठीण जाते . त्या मुंड्या 
जमिनीला टेकवून वाऱ्याबरोबर चारी दिशांना भरकटत जातात . 

दिमाखदार उंटाचे तसे नसते . ऐन वादळात तो ताठ मानेने धीराने वाटचाल करत असतो . 
- लौकरच ते वाळूचे वादळ त्या धनगरापर्यंत आणि त्याच्या मेंढयांपर्यंत पोचले . वारा घोंघावत 
होता , काळोख पसरला होता , धुळीने सूर्याला झाकून टाकले होते आणि धनगराला दोन 
पावलांवरची वाटसुद्धा दिसेनाशी झाली होती . 

__ वादळ सूं सूं भणाणत होते तेव्हा आपल्या भल्या मोठ्या अग्यात स्वत : ला गरफटून घेऊन 
तो धनगर मेंढ्याच्या कळपाशी मुकाट बसून होता . आकाशात विजांचा कडकडाट वाजत होता , 


G 


Das 


मेंढया घाबरून वाळवंटात सैरावैरा धावत होत्या . धनगराने त्यांच्या मागे धावायचा प्रयत्न केला , 
पण जोरदार वान्यांनी त्याला क्षणात भुईसपाट पाडले . त्याच्या नाका-तोंडात , डोळ्यात आणि 
कानात वाळूच वाळू भरली . वाळूचे कण त्याच्या दातांमध्ये चरचरा रगडले जाऊ लागले . वादळ 
संपेपर्यंत मुकाट पडून राहण्याशिवाय दुसरा उपाय नव्हता . त्या अंधारात आंधळ्याप्रमाणे चाचपडत 
फिरणे त्याला शक्य नव्हते . 

सकाळच्या सुमाराला वाऱ्याचा जोर कमी झाला आणि आपल्या वाळूच्या आडोशामधून 
तो धनगर सरपटत बाहेर आला . पण त्याने भोवती नजर टाकली तेव्हा तिथे कुणाचाच पत्ता 
नव्हता – ना त्याच्या मेंढ्यांचा ना कुत्र्याचा ! जणू वादळाने त्यांना गिळून टाकले होते . 

वाळवंट धुंडाळीत असताना त्या धनगराला एक छोटी पितळेची वस्तू सापडली . मेंढयांच्या 
कळपाचा पुढारी असलेल्या म्हातान्या बकऱ्याच्या गळ्यातली ती घंटा होती . त्या सेर्का नांवाच्या 
म्हातान्या बकऱ्याच्या गळ्यातली घंटा हरवली होती याचा अर्थ पुढे दुर्दैव वाढून ठेवलेले होते . 
कारण त्या घंटीचा आवाज अनेक मैलपर्यंत ऐकू येत असे आणि त्या आवाजाच्या दिशेने धनगराला 
आपल्या कळपाला हुडकून काढता येत असे . आता तो आपल्या मेंढया कशा शोधणार ? गवताच्या 
गंजीमधून सुई हुडकून काढण्याइतकेच ते काम अवघड होते . . . 

लगबगीने तो धनगर खेड्यात परत आला आणि लोकांना गोळा करून मेंढया शोधायला चार 
दिवस व चार रात्री त्यांनी वाळवंट पालथे घातले . . . अखेर पाचव्या दिवशी त्यांना शोध लागला ! 
त्या मेंढ्या कुठे होत्या ठाऊक आहे ? कुरणापासून तब्बल दोनशे मैल दूर ! 

एका बिनवापरातल्या पाण्याच्या विहीरीपाशी कळप शांतपणे चरत 
होता . सर्व मेंढे आणि मेंढया सुखरूप होत्या . आणि त्याचे श्रेय त्या इमानी 
कुत्र्याला होते . गेले पाच दिवस तो कुत्रा भूक आणि तहान सहन करीत 
होता . पण त्याने त्या मेंढ्यांपासून आपली जागा सोडली नव्हती व आपल्या 
मालकाची वाट पहात तो मेंढ्यांची राखण करीत राहिला . 


R 


SELETE 


ANTILIBASY 


। 


RS 


GSSSPORTS 


काws ETTER 


STARTEDLE 


AHMEEMENBAESTHE 


अकबाय 


आता मी तुम्हाला अक्बाय नांवाच्या वाळवंटातल्या आणखी एका कुत्र्याची गोष्ट सांगणार 
आहे . वाळूच्या टेकड्यांमध्येच , आपल्या मालकाच्या मेंढयांची राखण करीत तो लहानाचा मोठा 
जारमा . बाळवंटातल्या लांडग्यांना त्याची मोठी धास्ती बसली होती . शूर अक्बायला कुणीही जोड 


काहीवेळा लांडग्यांच्या कळपाची धूर्त पुढारीण आपल्या दोन टोळ्या बनबायची . छोटया 
टोळीला ती राखणदार कुत्र्यावर सरळ सरळ हल्ला करायला पाठवायची आणि त्याचवेळी लांडग्यांची 
मोटी टोली तिच्या पुढारीपणाखाली मेंढ्यांच्या कळपाच्या पिछाडीकडून धाड घालायची . अशा 
फनोने लाडन्यांचा कळप अनेक मेंढ्यांना ठार मारायचा आणि आपली लूट पळवायचा . 

सम अनुभवी अक्बायला लांडग्यांच्या युक्त्या माहीत झाल्या होत्या . आणि त्याला आपल्या 
मैडचाही माहीत होत्या . कोणतीही युक्ती त्याला त्याच्या जागेपासून ढळवू शकत नव्हती . 

परंतु आता हा धनगरी कुत्रा म्हातारा होत चालला होता . लौकरच अशी वेळ येऊन ठेपली 
की , त्याच्या मालकाला नाइलाजाने त्याला खेड्यात परत पाठवणे भाग पडले . या म्हातान्या 
कुयाने आपले आयुष्यातले अखेरचे दिवस निवांतपणे झाडांच्या थंडगार सावलीत , मऊ मऊ 
यादानावर बसून काढावेत अशी त्याच्या मालकाची इच्छा होती . 
___ वाठवंडात जायला निघण्यापूर्वी त्या कुत्र्याच्या मालकाने - चारी आजोबाने -- अक्बायला 
वाजळीने बांधले आणि कमीत कमी एक दिवस त्याला मोकळा सोडू नये असा हुकूम दिला . 
महामाजे तो धनगर खूप दूर अंतरापर्यंत गेला असता आणि त्याचा पाठलाग करीत जाणे कुत्र्याला 
शाक्य झाले नसते . साहजिकच सबंध दिवसभर आणि अर्ध्या रात्रीपर्यंत म्हातारा अक्बाय भुंकत 
साहिला आणि साखळीला हिसके देत राहिला . ज्या क्षणी त्याला साखळीपासून मोकळे करण्यात 
आले , त्या अणाला पुढ्यातल्या थाळीतल्या खाण्याच्या पदार्थांकडे ढुंकूनही न पाहता त्याने 


वाळवंटाच्या दिशेने धाव घेतली . त्याच्या आयुष्यातला तो अत्यंत खडतर प्रवास होता . रणरणत्या 
वाळवंटामधून पाण्याविना किंवा सोबतीच्या मदतीविना त्याला दोनशे मैलांहून जास्त अंतर 
काटायचे होते . 

अखेरीस तो कुरणाजवळ पोचला तेव्हा थंडगार पाण्याशेजारी अक्बाय थकून कोसळला 
आणि घटघटा घटघटा पाणी पीत राहिला . .. मग थकलेली मुंडी खाली झुकवून तो खरडत 
खरडत आपल्या घराशी विश्रांतीला गेला . पण त्यापूर्वी त्याने नव्या तरुण राखणदार कुत्र्याला 
तेथून दूर हाकलले . 

आपल्या जुन्या मित्राला पाहताच चारी आजोबांना डोळ्यातले अश्रू आवरणे कठीण झाले . 
ते अक्बायजवळ गेले , त्याच्या शेजारी बसले आणि हळुवारपणे त्याचा कान खाजवीत त्यांनी 
पुटपुटत क्षमा मागितली . 

आपल्या मालकाची जणू हजेरी घ्यावी अशा त-हेने म्हातारा 
अक्बाय प्रथम तक्रारीच्या सुरात केकाटला , पण लौकरच त्याचे शेपूट 
हलू लागले . त्याचे स्वागत केल्याबद्दलचा व तो पुन्हा तेथे हवा होता 
हे समजल्याचा आनंद , हलणारे शेपूट दाखवीत होते . 


गुपित 


एकदा मी चारी- आगा आणि अक्बाय यांच्या भेटीला त्यांच्या वाळवंटातल्या मुक्कामी 
मोल्लो होतो . म्हाताऱ्या धनगराने मला थोडे खायला दिले आणि मडके भरून ताजा हिरव्या पत्तीचा 
चहा दिला . मग मला म्हणाले : 

“ माझ्या पोरा , जर तुला धनगर व्हायचं असेल तर कामाचा अनुभव घेतला पाहिजे . 
दिसायला हा मेंढ्या राखायचा धंदा सोपा असला , तरी तो शिकायला आयुष्य पुरत नाही , हे 
माझे शब्द लक्षात ठेव . तेव्हा मी तुला पहिला धडा शिकवतो . तो उंट पाहिलास ? त्याच्या 
साटोबर मी दोन बुधले लटकावले आहेत . त्या उंटाला विहीरीपर्यंत घेऊन जा आणि पोरा , 
माझ्यासाठी तेवढं पाणी भरून घेऊन ये . ते पाणी चहाला खूप ताजं असतं . 

पण एक गोष्ट सांगतो . वाटेत जर तुझ्या उंटानं गवत चरायला किंवा आडवाटेला भटकायला 
मुसुरुवात केली , तर त्याला तसं करूं दे . त्याला मारू नको आणि त्याच्यावरून खाली उतरू नको . 
कोल्यातीला अकबायला घेऊन जाऊ शकतोस . " 

तर असे आम्ही तिघे निघालो : अक्बाय , उंट आणि मी . 

मी चाललो , चाललो , पण विहीरीचा पत्ता नव्हता . पुढे मला नंतर समजले की , ती विहीर 
ताबाट बारा मैल अंतरावर होती . मुलाच्या दृष्टीने हे अंतर कमी नव्हते . माझा उंट रमतगमत 
चालला होता , गवत चघळत होता , सगळ्या वाळूच्या टेकड्यांना वळसे घालत होता . हा सर्व 
बेट अक्वाय बिळातल्या उंदरांचा पाठलाग करीत होता आणि सशांची घाबरगुंडी उडवीत होता . 
काही वेळानंतर आम्हाला एक म्हातारा वाटसरू भेटला . 

ए पोरा , " त्याने हाक मारली , " अशा वेळेला कुठं चाललायस ? लौकरच अंधार पडेल . " 
मी माझ्या कामगिरीची त्याला माहिती दिली तेव्हा तो ओरडला . 


" काय ? संध्याकाळची वेळ जवळ आली असताना वाळवंटात जाण्यचा धोका पत्करतोस ? 
तशी विहीर फारशी लांब नाही म्हणा ! " 

असे म्हणून त्याने माझ्या उंटाचा लगाम हाती पकडला . आम्हाला मागे वळवण्याचा त्याचा 
इरादा होता . पण अक्बायने अचानक त्याची विजार मागल्या बाजूने तोंडात पकडली . 

“ अक्बाय , सोड त्याला , " मी रागाने ओरडलो . 

पण त्या हट्टी कुत्र्याने माझे मुळीच ऐकले नाही ; जेव्हा वाटसरूने लगाम सोडून दिला 
तेव्हाच अक्बायने त्याची विजार सोडली . 

जणू काही घडलेच नाही अशा थाटात आमची उंटाची स्वारी पुढे निघाली . 


" त्याला जोरात पिटाळ " म्हातारा वाटसरू ओरडला . “ लौकरच रात्र पडेल ; तू वाळवंटात 
रस्ता चुकशील . " 

" मी माझ्याकडून जास्तीत जास्त प्रयत्न करतो , " मी उत्तरादाखल ओरडलो . पण प्रत्यक्षात 
मात्र चारी आजोबांच्या आज्ञा मी पाळल्या . उंटाला मारायचे नाही आणि उंटावरून खाली उतरायचे 
नाही . 

अशा रीतीने मी माझा शब्द पाळला आणि उंटाला मनमोकळे चालू दिले . आणि आनंदाची 
बाब म्हणजे आम्ही लौकरच विहीरीजवळ पोचलो . वाळवंटातल्या पाणथळ जागेच्या आम्ही जवळ 
पोचलो तसे चारी बाजूंनी कुत्री भुंकत आमच्या अंगावर चालून आली . पण आमचा वास 
ओळखताच , जण जुन्या मित्रांचे स्वागत करावे त्याप्रमाणे त्यांनी आपल्या शेपट्या हलवायला 
सुरुवात केली . कुत्र्यांपाठोपाठ एक मुलगा तेथे आला . माझ्यापेक्षा तो सुमारे पाच वर्षांनी मोठा 
असावा . अर्थात मी माझ्या उंटावर मोठ्या दिमाखात बसून राहिलो होतो . जणू त्याला दाखवून 
देत होतो – “ माझ्याकडं वर पहा . मी वाळवंट ओलांडून आलोय , माहीत आहे ? " 

त्याने किंचित ताठपणेच मान झुकवली आणि माझ्या उंटाला गुडघ्यांवर खाली बसवले . 
आमचे बुधले पाण्याने भरले आणि हाताने झटकून निरोप दिला . जणू मी म्हणजे उंटाच्या 
पाठीवरची एक क्षुल्लक माशी होतो ! 

माझा उंट चटकन उठला आणि त्याने परत वाळवंटाचा रस्ता धरला . आता मात्र तो कुठेही 
थांबत नव्हता . भुलावण्या देणाऱ्या गवताकडे दुर्लक्ष करून त्याने वाळूच्या टेकड्यांमधून तडक 
घरची वाट धरली . आणि राखणदार कुत्र्याप्रमाणे त्याच्या शेजारून अक्बाय धावत होता . उंदरांना 
पकडण्याचे विचार त्याच्या डोक्यातून आता पळाले होते . आणि रात्र पडण्यापूर्वीच आम्ही चारी 
आजोबांकडे परतलो . 

“ शाब्बास पोरा ! छान काम पार पाडलंस ! अक्बाय , शहाणा कुत्रा आहेस ! " चारी 
आजोबा म्हणाले . 

___ अशा रीतीने काम चालले होते . शरद ऋतूच्या अखेरच्या दिवसांपर्यंत मी विहीरीतून पाणी 
आणायचे काम करीत होतो . आणि जेव्हा मी घरी परत 
जायला निघालो तेव्हा कुठे मला ते गुपित समजले . 

मी तेथे येण्यापूर्वी , अक्बाय आणि तो उंट असे 
दोघेच पाणी आणण्याचे काम करीत . . . चारी 
आजोबांनी त्यांना शिकवले होते ! 


INTERNOORNAL 


PRASTRISANE 

RSS 


PRODE 


HERE 


AAAAFER 


SARGAMAcid 

OraSHREE 

SNETAITIES Antop 


CAYAN 


STAudi 


धनगराची नजर 


एकदा भूगोलशास्त्रज्ञांचा एक छोटा काफला काराकुमचे काळे वाळवंट ओलांडत चालला 
होता . त्या लोकांना अख्खा पंधरवडा त्या वाळवंटामधून अगदी एकाकी कंठावा लागला होता . 
सोबतीला फक्त वाळू आणि उंट . अखेरीस ते किझील्यार नांवाच्या धनगरवस्तीवर जाऊन पोचले . 
या वस्तीत पाच धनगरांची घरे होती . त्यांपैकी तीन कझाख होते , दोन तुर्कमेनी होते . 

पतेक नांवाच्या प्रसिद्ध वाळवंटी राखीव अभयारण्याकडे ते भूगोलशास्त्रज्ञ चालले होते . 
यामा अचानक त्या धनगरांच्या मेजवानीच्या वेळी तेथे हजर राहण्याचा योग त्यांना लाभला . अशा 
मेजवानोला धनगर लोक तोई म्हणतात . त्या दमल्याभागल्या प्रवाशांचे स्वागत करून त्यांना 
आपत्ते मानून खाऊ-पिऊ घालण्यात त्या अतिथीप्रेमी धनगरांना साहजिकच खूप आनंद झाला . 

चरबीयुक्त मटणाच्या शूर्पा ( मटणाचे सूप ) नांवाच्या सूपनंतर बेशबार्माक ( मटणाचा 
सादा ) या शेवयांसकट शिजवलेल्या मटणाच्या पदार्थावर मंडळींनी यथेच्छ ताव मारला व फुरके 
मारून चहा पीत गप्पागोष्टी चालू झाल्या . 

त्यावेळी प्रत्येकाच्या मनात दुष्काळाच्या भीतीने ठाण मांडले होते . वसंत ऋतू संपत आला 
होता तरी अजून पावसाचा पत्ता नव्हता . गवत सुकून भाजून गेले होते आणि त्याला मक्याचा 
फिकट भरा रंग आला होता . जनावरांना खायला काय घालायचे ? 

गर्भार उंटिणींसारखं कण्हायचं थांबवा , " एक भरडा आवाज उमटला . “ मेजवानी संपायच्या 
वोपर्यंत तुम्ही सारे पावसानं भिजून ओलेचिप्प व्हाल ! " 

तो वारी आजोबांचा आवाज होता . रात्रीसाठी आपल्या मेंढयांना कोंडवाड्यात घालून 
आता ते आपल्या रंगीबेरंगी दुलईवर येऊन बसत होते . 

पण हे तुम्हाला कसं समजलं ? " एका भूगोल शास्त्रज्ञाने विचारले . “ आकाश तर अगदी 


LADOOG 


" अरे माझ्या उंटाच्या बछड्या ! " म्हातारा धनगर हसून म्हणाला . " तुम्ही लोक आज इथं 
मेरमार हे काल मला जेवढं पक्कं माहीत होतं , तेवढंच आता पाऊस पडणार हे मला ठाम माहीत 


" चारी- आगा , तुम्ही कोड्यांची भाषा बोलताय . " 

" मेंढीच्या ढुंगणाला शेपटी असते हे सांगण्याएवढं माझं बोलणं साधं- सोपं आहे . " आपल्या 
प्रत्येक बोटावरची मटणाची चरबी चाटून पुसून खात म्हातारबाबा बोलले . " मेजबानीला यायला 
उशीर होईल या भीतीनं तुमच्या वाटखुणांवरून मी माझ्या मेंढयांना पिटाळत आणलं . ऐका 
माझ्या कोकरांनो , तुम्ही शाळा -कॉलेजात काही थोडी वर्ष घालवलीत , तर या वाळवंटात शिकण्यात 
माझं अख्खं आयुष्य गेलंय . ही काळी वाळू माझी शिक्षक . दहा वर्षांपूर्वी तुम्हा लोकांना मी माझा 
सर्वांत चांगला उंट विकला होता आणि त्यानंच तुम्हाला आज इथं आणलं . त्याच्या पाऊल खुणा मी 
कुठंही ओळखतो . चेहऱ्यावरून माणसाचं वर्णन करता येतं तसं पावलांच्या खुणांवरून जनावर 
ओळखता येतं . ” 
__ _ “ ठीक आहे चारी- आगा , " भूगोलशास्त्रज्ञ म्हणाला , " तुमचं दुसरं रहस्य सांगा . लौकरच 
पाऊस पडेल असं कोणत्या आधारावर तुम्ही एवढया खात्रीनं सांगता ? " । 

“ आता नक्की पाऊस पडेल . येताना वाटेत माझी मेंढरं जणू वान्याला तोंड द्यावं तशी 
एकमेकांजवळ गर्दी करून आणि मुड्या भुईला टेकवून उभी राहिली . ही पावसाची हमखास 
खूण आहे . " 

तरीही माणसे सावध होती . सूर्य नेहमीप्रमाणेच निर्दयपणे भाजून काढत होता . आकाशात 
एकही ढग दिसत नव्हता किंवा त्या धुळकट वाळवंटात वाऱ्याची एकही झुळूक वहात नव्हती . 
पण म्हातान्या धनगराचे बोलणे खरे ठरले . मेजवानी संपायच्या आतच वाळूवरून जोरदार वारे 
वहायला सुरुवात झाली व आकाशात वादळी ढग जमा झाले . 

आणि पावसाच्या सरी कोसळू लागल्या . 
- भूगोलशास्त्रज्ञांचा काफला जेव्हा रेपेतेकला जायला निघाला , 
तेव्हा त्यांचे पाय ओल्या वाळूमध्ये रुतत होते आणि वाळवंटातल्या 
गवताच्या ताजेपणाकडे व डोळ्यांदेखत उमललेल्या फुलांकडे त्यांचे डोळे 
नवलाईने पहात होते . 

नदीच्या वाळूसारखा त्या ओल्या वाळूला ताजा वास येत होता . 


खरा मित्र 


त्या उंटाचे नांव होते बायोर- होल्म . म्हणजे पर्वताएवढा प्रचंड तो उंट खरोखरच खूप 
मोबा आणि ताकदवान होता . 

जेव्हा तो म्हातारा झाला तेव्हा त्याच्या मालकाने त्याला टाकून दिले नाही किंवा त्याला 
जीनामाचाही जुपले नाही . त्या इमानी जुन्या सेवकाला निवांतपणे राहू देण्यात आले . पण त्या 
बाटाच्या डोक्यात मात्र दुसरेच विचार होते . माणसाच्या दयाळूपणाची , त्याच्या प्रेमळ थोपटण्याची , 
लाडक्या शब्दाची , भल्या मोठ्या केसाळ कानांना गंमतीने त्याच्याकडून ओढून घेण्याची त्या उंटाला 
सवय लागली होती . नुसते गप्प बसून राहणे त्याला अजिबात आवडत नव्हते . 

एक दिवस एक छोटा मुलगा हातात भाकरीचा तुकडा घेऊन बायीर-होल्मजवळ आला . 

" माझं नांव मुराद , " तो उंटाला म्हणाला . “ आणि तुझं नांव बायीर आहे ना ? चल , 
आमामा मित्र होऊ या . " 

मुराद आपल्या मित्राला भेटायला रोज येऊ लागला . येताना तो उंटासाठी खायला घेऊन 
पाई आणि त्याला प्रेमाने थोपटे . दरम्यान , आपल्या छोटया मित्राला खूष करण्यासाठी तो म्हातारा 
बाट जमिनीवर आडवा पसरून राही . काही वेळा तर आपल्या टेंगळेदार पाठीवरून त्याला फिरवून 


मे महिन्याचे शेवटचे दिवस होते . वाळवंटातले गवत एव्हाना सुकून गेले होते . सर्पण गोळा 
कालाबाला मुराद बायीरला घेऊन गेला होता . वाळवंटातल्या विरळ झुडुपांच्या काटक्यांच्या त्या 
सोमावाकड्या बांधलेल्या मोळ्या मुळीच जड नव्हत्या , पण तो उंट त्यांना एवढ्या दिमाखाने 
योजन चालला होता की , जणू तो पूर्वेमधले भारी किंमतीचे खजिनेच वाहून नेत होता . छाती 
पुढे काडून चालताना तो दाखवू पहात होता की , तो पुन्हा काम करीत होता आणि लोकांना 
सादात करोत होता . 


अशाच एका भटकंतीमध्ये तो मुलगा आणि उंट एका दूरच्या झाडीजवळ पोचले . तेथे 
वाळलेल्या काटक्या होत्या . मुरादने भरपूर सर्पण गोळा केले . माध्यान्हीच्या तापत्या उन्हात तो 
मजेने काम करीत होता . पण लौकरच त्याला तहान लागली आणि उष्मा जाणवू लागला . तेव्हा 


त्याला आठवण झाली की , पाण्याचा खुजा तो घरीच विसरला होता . आपल्या विसरभोळेपणाची 
त्याला लाज वाटली . घर खूप दूर असल्याने जवळच्याच जुन्या ताकुर मधून पाणी घेणे योग्य 
उरेल असे त्याला वाटले . ताकुर म्हणजे आटलेल्या तळ्याच्या जागी सूर्याच्या कडक उन्हाने भाजून 


निघालेला वाळूचा बधारा . ताकुर मध्ये पाण्याचे छोटे छोटे ओहोळ असणार याची मुरादला खात्री 
होती . 

दुरून त्याला सूर्यप्रकाशात ते आरशासारखे चमकत असलेले दिसत होते . मातीतल्या मिठामुळे 
त्याचा पृष्ठभाग पांढराशुभ्र दिसत होता . 

प्रथम बायीरने वाळूच्या बांधाच्या दिशेने ठामपणे पाऊल टाकले , पण तो नंतर एकदम मागे 
सरला आणि रेसभरही पुढे सरकेना . 

" चल बायीर , " मुराद त्याला रागावून म्हणाला . " इथून आपलं घर खूप लांब आहे . 
पाणी मिळालं नाही तर आपल्या दोघांचेही फार हाल होतील . " 

उंटाच्या पाठीवरून उतरून तो पाण्याच्या दिशेने धावला असता , पण बायीरने त्याचा 
सदरा आपल्या दातांमध्ये गच्च पकडून धरला . 

“ आज काय तुला गंमत करायची लहर आलीय ! " मुराद उद्गारला . “ मला फक्त पाणी 
प्यायचंय . भयंकर गरम होतंय . " 

बायीरने त्याचे ऐकले नाही . 

भाजलेल्या पिठाप्रमाणे पायाखालची वाळू मऊ भुसभुशीत झालेली होती . पण आपली तहान 
कशी लौकर भागवायची एवढ्याच विचाराने त्या मुलाला घेरले होते . पाण्याची विहीर डझनभर 
पावलांच्या अंतरावर होती . बायीरच्या पकडीतून हिसका मारून त्याने स्वतःला सोडवून घेतले 
आणि जमिनीवर उडी मारली . . . आणि ताबडतोब गुडघ्यापर्यंत त्याचे पाय बाळूत रुतले . त्याने 
खूप जोराने प्रयत्न केले , पण मिठी घालणाऱ्या वाळूमधून त्याला आपले पाय वर खेचता येईनात . 
आपण हळूहळू वाळूत बुडत चाललो आहोत ही भयंकर जाणीव त्या मुलाला झाली . वाळू त्याला 
खाली खाली ओढत होती . आपल्या पोटावर पालथे पडायचा त्याने प्रयत्न केला , पण ती धोकेबाज 
वाळू एकदम बाजूला सरली आणि तिच्या फटींमधून पाणी झिरपले . 

" बायीर ss ” घाबरून मुराद ओरडला . 

त्या म्हाताऱ्या उंटाला या संकटाची आधीच कल्पना होती . सरकणाऱ्या वाळूवरून त्याने 
लटपटती पावले टाकली , मग आपल्या पोटावर तो खाली बसला आणि धडपडणाऱ्या मुलाच्या 
दिशेने सरपटत सरकला . 

उंटाच्या वजनाखाली वाळू खाली दबत चालली होती , तरी बायीर जास्तीत जास्त मुरादच्या 
जवळ सरकला , आपल्या बळकट दातांमध्ये त्याने त्याचा सदरा धरला आणि जोरात झटका देऊन 
त्याने मुरादला त्या वाळूच्या पकडीतून मोकळे केले . ऐन मोक्याच्या वेळी मुराद त्या दलदली 
वाळूमधून निसटला आणि भस्सदिशी तो खड्डा वाळूने बुजून गेला . 

मरादने आपल्या मित्राला मिठी मारली . त्या उंटाच्या विचित्र डोक्याला कृतज्ञतेने त्याने 
आपले डोके घासले . 

“ बायीर , मला क्षमा कर , " आपल्या शहाण्या म्हातान्या मित्राची त्याने विनवणी केली . 
" आता इथून लौकरात लौकर निसटून जाऊ या . " 

उंटाने मुरादकडे कष्टी , प्रेमळ नजरेने पाहिले , पण तो जागचा हलला नाही . तेव्हा कुठे 
मुरादच्या ध्यानात आले की , वाळूने उंटाला मिठी घातली होती आणि लौकरच तिने 
बायीरला सबंध गिळून टाकले असते . 

" बायीर , अरे मित्रा घाबरू नको . जरा दम धर ! ” मुराद ओरडला आणि चपळाईने 
त्याने उंटाच्या पाठीवरची वाळक्या काटक्यांची मोळी सोडवून त्या काटक्या भराभरा उंटाच्या 


पोटावाली घातल्या . मागे वळूनही न पाहता , घरून मदत आणण्यासाठी जेवढ्या वेगाने पळता 
येईल तेवढा तो पळत सुटला . 

अनेक वेळा तो वाळवंटातल्या भाजत्या वाळूवर कोसळला . जेव्हा त्याच्या पायातली ताकद 
नाहीशी झाल्यासारखी होत होती तेव्हा मधून मधून तो सरपटत जात होता . ती दलदलीची वाळू 
त्याची वाट पहात राहणार नाही या विचाराने तो पुढे पुढे धावत होता - त्याला आपल्या मित्राला 
दावलेच पाहिजे होते . 

अगदी गलितगात्र अवस्थेत तो तंबूपाशी पोचला , तंबूची कनात त्याने फाडकन उघडली 
आणि घोगऱ्या आवाजात तो पुटपुटला , 

" बायोरला वाचवा , त्यानं मला वाचवलंय . .. ” । 
एवढे बोलून अतिश्रमांमुळे तो बेशुद्ध पडला . 

तो मुलगा शुद्धीवर आला तेव्हा सकाळ उजाडली होती . पण त्याच्या शुश्रूषेला अवतीभवती 
कुमात्र नव्हते . प्रत्येकजण आपापल्या रोजच्या कामाला निघून गेला होता . 

“ बायीर ! " एकदम उठून उभे राहताना त्या मुलाला आठवण झाली . त्याचे पाय लटपटत 
होते . डोके गरगरत होते , पण कसाबसा तो तंबूबाहेरच्या मोकळ्या हवेपर्यंत पोचला . 

आणि तिथे तंबूबाहेर , बायीर समाधानाने गवताचा घास चघळीत होता . 
मुलाला पाहताच त्या म्हाताऱ्या उंटाने चघळणे थांबवले आणि आपले डोके 
बाजूला फिरवले . किती मजेदार दिसत होता तो ! त्याच्या तोंडाच्या दोन्ही 
बाजूनी गवत डोकावत होते , जणू त्याला मिशा उगवल्यासारख्या दिसत होत्या . 

मुरादच्या डोळ्यात समाधानाचे आणि आनंदाचे अश्रू होते . 


धनगराचे जीवन 


कूलीचे वडील याझखान हे धनगर होते ; आणि त्यांचे वडीलही धनगर होते व त्या 
वडिलांचे वडीलही धनगर होते . . . 

आपल्या वाकड्या सोट्यावर रेलून एखाद्या वाळवंटातल्या झाडासारखा कूली स्तब्ध उभा 
होता . वाळूमध्ये ती एखाकी आकृती एकाद्या उंच सुळक्यासारखी भासत होती . दूरवर 
टेकड्यांपलिकडे सायंकाळचा थकलाभागला सूर्य ओठंगला होता . सूर्याने आणि धनगराने एकमेकांना 
चांगले समजून घेतले होते . अखेरीस त्यांचे दैनंदिन जीवन सारखेच होते . 

कूलीच्या पलिकडे त्याच्या मेंढ्या होत्या . त्या दीड हजार मेंढया वाळवंटातल्या कुरणात 
चरत होत्या . एकटा कूली आणि साकार व बासार नांवाचे त्याचे दोन कुत्रे त्या मेंढ्यांची राखण 
करीत . सूर्य जरी आता क्षितिजावर मावळला होता तरी आगीत केस जळल्यानंतर येतो तसा 
भाजका वास वाळूला अजूनही येत होता . 

त्या उन्हाळ्यात कूली सुकून गेला होता आणि रापला होता . पण त्याबद्दल त्याच्या काही 
तक्रारी नव्हत्या . ना सूर्याबद्दल , ना वाऱ्याबद्दल , ना वादळाबद्दल त्याची तक्रार होती . त्याचे 
जीवनच तसे होते . दात गच्च आवळून धरायचे आणि वाळूच्या व बर्फाच्या वादळांना तोंड द्यायचे , 
मुसळधार वासंतिक पावसाच्या धारा झेलायच्या आणि लांडग्यांच्या भयानक आरोळ्या ऐकायच्या . . . 

सकाळी नऊ वाजता कूली आपल्या जनावरांना पाणी पाजायचा ; मग दुपारची ऊन्हे 
निवेपर्यंत मेंढ्या , कुत्रे आणि तो विश्रांती घेत गप्प पडून रहात . एकदा का सूर्य दूरच्या टेकड्यांवर 
घसरला की , सेर्काच्या गळ्यातली घंटा कळपाला दचकवून एकदम जाग आणायची . 

अशा प्रकारे आता कूली त्या घंटेची किणकिण ऐकायची वाट पहात होता . ती वाजायला 
लागताच सेर्का कळपाला गोळा करू लागला , कारण आता चांगलेचुंगले खायला मिळणार हे त्याला 


माहीत होते . मेंढरे खाणे खायला आली . कूली त्यांच्या पाठोपाठ काही अंतरावर चालत गेला , 
माल्या. याबला आणि आपल्या वाकड्या सोट्यावर रेलून सूर्यास्त पाहू लागला . केशरी सूर्यकिरणांनी 

इनमगाराला एकदा शेवटचे डोळे मिचकावून दाखवले आणि विश्रांतीसाठी ती बुडून गेली . 
सूर्य विधातीला गेला , पण कूलीचे काम आत्ता कुठे सुरू झाले होते . 

" उद्या सकाळी भेटू , " कूली सूर्याला उद्देशून म्हणाला .. . 
सबंध दिवसात त्याच्या तोंडून एवढेच शब्द उच्चारले गेले होते . 

मैदानावर काळोख पसरत गेला . आणि जेव्हा आकाशालाही त्या काळोखाने वेढले तेव्हा 
आलादो चंद्र उगवला . आपल्या भेदक नजरेने त्याने अंधाराला बाजूला सारले आणि उंदरांच्या 
बिळावरून त्याच्या सावल्या झरझर पसरत वाळूत वितळून गेल्या . 

जेव्हा चंद्र टेकड्यांपासून वर गेला तेव्हा कूलीने मेंढ्यांमधून आपले खेचर बाजूला काढले 
आणि त्याच्या गळ्याभोवती घंटा बांधली . ते खेचर त्यांचे जेवण आणि पाणी वाहून आणत असे . 
ज्जाल . नात्रीच्या वेळी चुकून ते इकडेतिकडे भटकत राहिले असते , तर कूली आणि इतर जनावरे 
नकली व तहानेली राहिली असती . 

अखेरीस वाळवंटातली उष्णता निवली आणि थंडीच्या लाटेने वाळवंटाला वेढून टाकले . 
चादाण्यात न्हाऊन निघणाऱ्या टेकड्या दुधाळ धूसर भासत होत्या . मैदानात चांदणे एवढे लख्ख 
साढले होते की , पायांखालचे वाळूचे कण हिमकणांसारखे चमकत होते . 

मंडरे बिनधास्तपणे चरत होती . 

कूलीच्या पायाशी बसलेल्या कुत्र्यांनी आपल्या दमलेल्या पंजांवर डोकी टेकली होती . त्यांनी 
डोळे मिटून घेतले होते तरी जरासे खुट्ट होताच वान्याने पाने फडफडावीत तसे त्यांचे कान 
अस्वस्थपणे थरथरत . सारे काही शांत निवांत भासत होते . त्या रात्री कुणाही लांडग्याला कळपावर 
हल्ला करायची हिंमत झाली नसती . 

मंड्या चोरायला मोठे कसब लागते . मेंढया कमालीच्या संवेदनाक्षम असतात , भेदरट 
असतात . जर लांडग्यांनी सरळ हल्ला चढवला तर त्या पटकन त्यांच्या आधीन होतात . जर 
साताको मागून लपतछपत आले तर त्यांना धनगराला तोंड द्यावे लागते . आणि दोन्ही बाजूंनी 
कुत्रे राखण करीत असतात - उजवीकडून साकार व डावीकडून बासार . 

मंड्या चरत होत्या , कुत्री स्वप्ने पहात होती आणि धनगर उंच आकाशातल्या चंद्राकडे 
टक लावून पहात होता . कुठूनतरी हळूच वाऱ्याची झुळूक आली . त्या निस्तब्ध , निवांत , 
चादण्यातल्या देखाव्याला पाहून काळजात हलके हलके वाटत होते . 
____ मध्यरात्रीला मेंढ्या चरायच्या थांबल्या आणि थंडगार वाळूवर विश्रांती घ्यायला मोकळ्या 
मैदानात एकत्र गोळा झाल्या . कूलीने खेचराच्या पाठीवरून खाण्या-पिण्याच्या जिनसा उतरवून 
मोक्ताल्या , अनेक वाळक्या काटक्या मोडून त्यांचा ढीग बनवला आणि शेकोटी पेटवली . मग त्याने 
ताच्या च्या किटलीत पाणी ओतले व आगीवर पाणी उकळायला ठेवले . रबराच्या भांड्यात आपल्या 
कुञ्यासाठी त्याने थोडे पाणी ठेवले . साकार उठून आपले पाणी प्यायला , बासार तसाच 
आमटून पडून राहिला . 

शेकोटी छोटी होती तरी तिच्या प्रकाशाने डोळे दिपून जात होते . धनगराने आगीच्या 
मणीजवळ पसरलेल्या आपल्या हातांनी डोळ्यांवर आडोसा धरला होता . त्याच्या बधीर शरीरामधून 
जाममातेची ऊब हळूहळू पसरत चालली होती . त्याच्या तांब्याच्या तुंच ( चहाचे भांडे ) मध्ये जेव्हा 


ico 


23 


9 .66 


ESS 


। 


Sal 


HAN 


क्याम्मी उकळले तेव्हा कुलीने चांगला कडक चहा बनवला . कडक चहा चांगली ताकद देतो असे 
लल्याचे मत होते . 

त्या आगीपासून सुमारे दहा पावले दूर अंतरावर उभे राहून , केसाळ अंगरख्यात गुरफटून 
करतातल्या कुली तो गरम चहा पीत होता . आगीजवळ फार काळ बसून राहणे धोक्याचे असते . 
सातामाटातले सगळे सरपटणारे प्राणी आगीकडे आकर्षित होतात - वाळवंटातले कोळी , कांगारूसारखे 
अशाप्पी. काळे किडे . प्राणघातक विंचू तर सरळ आगीच्या दिशेने चालत येतो आणि त्याची विषारी 
लामी डान्ड मारायला नेहमी तयार असते . 

नालीने आपले चहाचे पहिले भांडे परत किटलीत ओतले . चहा चांगला मुरायला पाहिजे 
होता. .. तो मुरल्यावर त्याने पुन्हा भांड्यात चहा ओतला व नंतर त्याने चहाची अनेक भांडी 


पोटात रिचवली . त्यामुळे त्याची थंडी आणि तहान पळाली व त्याच्या नसांमधून ऊबदार रक्त 
वाहू लागले . 

आगीने शेवटच्या वाळक्या काटक्या लपेटल्या आणि भोवतालच्या इतर सर्व गोष्टींप्रमाणे ती 
स्तब्ध झाली . चांदणेसुद्धा मलूल भासू लागले . तारे चमकू लागले , कुत्री भोवती फिरू लागली , 
कळप डुलकी घेत होता . 

कूलीने आपला वाकडा सोटा डोक्याखाली घेतला होता . वाकडा सोटा म्हणजे धनगराची 
लोखंडी उशी . त्या उशीवर आडवे पडून तो पुन्हा एकदा आकाशाकडे निरखून पाहू लागला . 
आकाशात ध्रुव तारा चमकत होता , सप्तर्षि हळूच रात्रीच्या अंधारात चोरपावलांनी येत होते . 
पहाटेच्या वेळी ध्रुव ताऱ्याला मागे सारून पूर्वेला शुक्राची चांदणी चमकू लागली असती . आणि 
मग टेकड्यांवर सारा नक्षत्रगण चमकू लागला असता . 

ताऱ्यांची वाटचाल कशी वाचायची ते कूलीला त्याच्या वडिलांनी शिकवले होते . जरी 
लिहीता -वाचता येत नव्हते तरी म्हातान्या याझखानना एखाद्या खगोलशास्त्रज्ञासारखी आकाशाची 
माहिती होती . एकदा त्यांनी आपल्या मुलाला सांगितले होते : 

“ ऐक माझ्या पोरा , जर वाळवंटात तुला जायचं असेल , तर तुझ्या तळहाताप्रमाणं तुला 
ते माहिती पाहिजे . आणि आपल्या पाच बोटांसारखी तुला आकाशाची माहिती असली पाहिजे . 
आकाश माहिती असल्याशिवाय तुला वाळवंट समजणार नाही . " 

आणि कूली आकाशाशी व वाळवंटाशी नेहमी एकरूप 
होऊन राहिला . त्याच्या एकाकी धनगरी जीवनात आकाश आणि वाळवंट त्याचे सतत 
साथीदार होते . 


тауарларына арналган 


ЧА 


43 


r 


сан 


ура 


ТАНГРЫКУЛИЕВ 


ГЛАЗА ЧАБАНА 
на языке маратхи 


© मराठी अनुवाद , प्रगती प्रकाशन , १९७९ 


सोविएत संघात मुद्रित 


а 


о 


480301000 


та 10802 - 100 

014 (01)- 79 866- 79